Posts

Hopes..

वर्ष वाया जात असतं आयुष्य नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य संपत नाही. खुप काही करण्यासारखं असतं. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. काही गोष्टी उशिरा जगायला चालू होतील आयुष्यात. त्यानं एवढा फरक पडत नसतो. शेवटी समाधानानं जगणं आणि स्वतःवर प्रेम करत राहणं महत्वाचं. २२.०५.२०

स्वतःबद्दल..

स्वतःबद्दल..! स्वतःच मन मारणं आणि आपल्या मनाच्या विरोधात  आपण स्वतःसोबत तडजोड करत आहोत अशी गोष्ट करणं हे जगात सगळ्यात जास्त वाईट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याबद्दल दोन शब्द लिहायचे, बोलायचे किंवा कुणी माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथलं जजमेंट हे कदाचित दुनियेला मी कसा पाहिजे हे अपेक्षित करून असेल पण माझ्या मनात मी वर उल्लेखलेली गोष्ट तंतोतंत पाळणारा किंवा ती गोष्ट माझ्यात भिनलेला माणूस आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट स्वतःला पटली असेल तरच तिचा हव्यास आपल्याला असावा, ती गरजेची आहे म्हणून तिचा माग करणं कधीच जमलं नाही. विशेषणांच्या भाषेत बोलायचं झाल्यास संयम कमी आणि गरम डोक्याचा जास्त पण जबरदस्ती संयम पाळणारा, खूप जास्त आळशी, [माझं नेहमी असं म्हणणं आहे की मला संभाळायला एक माणूस लागतो. मी स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट करायला लावावी लागते तेंव्हा ते मी करतो. (पण मला याची लाज पण वाटत नाही. काय माहिती 😜) ], थोडाच हार्डवर्कर, माणसं जोडणारा, प्रचंड आशावादी, जबरदस्ती व्यायाम पण आवडीने झोपा काढणारा, भारतीय शास्त्रीय संगीत, पाकिस्तानी कव्वाली-गझल, उर्दू-हिंदी शायरी तसे...

"रात्रंदिनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."

"रात्रंदीनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."                                   - संत तुकाराम आपण रोजच्या जगण्यात जर उघडे डोळे ठेऊन वावरत असलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात किंवा याची जाणीव होऊन जाते की काहीतरी वेगळं म्हणजे जसं घडायला पाहिजे होतं तसं न घडता वेगळं काहीतरी घडतंय जे अपेक्षित किंवा सगळ्यांच्या सोयीचं नाही. माझं गाव सुद्धा याला अपवाद नाही. जे डोळ्याला दिसेल तिथं काम करायला वाव आहे. ते फक्त सरकारी यंत्रणेनंच केलं पाहिजे असा आपला हट्ट असेल तर मला वाटतंय आपण मागच्या दिशेने प्रवास करतोय. आपल्याला दिसतंय, आपण करू शकतोय आणि आणि केल्यानंतरचे परिणाम हे 'चांगले' असणार आहेत तर ते तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही केलं पाहिजे. यात सामाजिक जाणिव, देणं लागतो वगैरे फुसके वाक्य बोलून काही पदरी पडणार नाही. जे होईल ते आपल्याच सोयीचं होणार आहे फक्त एवढया अपेक्षेने केलं तरी काही न काही होऊन जाईल. लॉकडाऊन मूळ कामं धंदे सोडून गावी घरी बस...

दादा..

हा जन्म मिळाल्याचा सर्वात मोठा आनंद कोणता माहितीये..  तुझ्यासारखा माणूस मोठा भाऊ म्हणून लाभला!  ❤️🙏

असंच काहितरी..

प्रतिशोधाची भावना विवेकास हरवते. शांतता-संयम जिंदाबाद! 

आशावाद..

जगणं छान आहे म्हणत म्हणत जगण्याला अश्व लागायची वेळ आपल्यावर येऊन ठेपते हे बऱ्याचदा जगण्याचा महोत्सव करावा याची अक्कल आलेल्या वयातही कळत नाही. त्यावेळेस करावं काय आणि काय करायला पाहिजे हे काय करत होतो याकडे पाहून सुचतं. बऱ्याचदा जे करत होतो तेच पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे किंवा नवीन करतांना जे करत होतो ते न करता नव्याने नवीन करायचं आहे हे सुचून जातं. कुणाचीच वेळ गेलेली नसते. त्या त्या वेळेचं गांभीर्य ओळखून त्या त्या क्षणाला करावयाच्या गोष्टींना प्राधान्य देता आलं पाहिजे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून आपण फुसकी प्रेरणा घेत असतो पण वैध स्वप्नांइतकं स्वतःला पेटवत ठेवण्याचं सामर्थ्य अजूनतरी मला कशात सापडलं नाही. ते बारकुले असोत की मोठे पण खरंच स्वप्न बघावेत माणसानं. मसणवट्यात जायची वेळ आली तरी छाती फुटसतोवर मेहनत करण्याचं बळ देणारा आपल्यात आशावाद जिवंत असला की स्वतःच्या कर्तेपणावर शंका येत नाही. तो  कर्तेपणा फक्त तसा जिवंत असून उपयोग नाही त्याला चौफेर हालचालींची जोड असली म्हणजे वेल मांडवाला गेल्याशिवाय राहात नाही.  रडत सगळेच असतात आपापल्या कमीपणाकडं बघून, झिजून जाताना उत्साहान...

सोचो, खुश रहो..

ज़िंदगी के रास्तें उतने ही आसान होते जितने वो सुननें में लगते हैं तो शायद एक सूखे पत्ते की तरह बहकर इसे जिया जा सकता था। काश ऐसा होता। लेकिन ऐसा नहीं है। क़ुछ रास्तों पर चलते वक़्त हमें सोच समझकर क़ुछ अलग रास्तों को भूल जाना पड़ता हैं, या उन्हें अनदेखा करना होता हैं। लेकिन ये कितना ज़रूरी होता हैं ये तब नहीं समझता जितना आगे जाके हम पीछे मुड़कर देखने के बाद समझ आता हैं। ख़ैर, कुछ न कुछ छूट ही जाता हैं ऐसा कहकर हमें ख़ुद को उस हालात में सँवरना पड़ता हैं लेकिन इसका मतलब ये बिल्कुल नहीं होता कि हमें उन रास्तों की परवाह नहीं हैं।  बात सिर्फ़ इतनी ही नहीं हैं.. क़ुछ लोग, कुछ घटनाएं, कुछ पल, क़ुछ चीज़ें हमें ऐसेही रास्तों की तरह ही छोड़नी पड़ती हैं लेकिन तब छोड़ते वक़्त या हम उससें अलग होते वक़्त इस बात का पता नहीं चलता कि वो हमारी ज़िंदगी में कितनी अहमियत रखते हैं। हर पल, हर चीज़ हर इंसान यहां आपको आपकी ज़िंदगी और ख़ुशनुमां बनाने के लिए हैं। उनको संभलना उनसे जुड़कर रहना सीखें। क्या पता कब कौन कहाँ साथ छोड़ दे।  किसीने सच ही कहाँ हैं.. "उजालें अपनीं यादों के हमारें साथ रहने दो,  न जाने किस गली में ज़िंदग...